CivilMania
726 subscribers
176 photos
5 videos
102 files
47 links
All about Civil engineering
▪️Information about various competitive exams and their Recruitment process
▪️Discoveries in Civil engineering
▪️Motivational messages
🔥 Developing roads of success🔥
Visit : https://civilmania.in
✉️[email protected]
Download Telegram
Forwarded from 🚫 **Civil Zilha Parishad** 📶
MPSC टॉपर प्रसाद चौगुले म्हणतो, की 'ट्रायल आणि एरर'मध्ये अडकणाऱ्यांसाठी ही परीक्षा नाही

BBC news

"MPSCचा अभ्यास सुरू करताना तुमचा वर्षभराचा प्लॅन तयार असायला पाहिजे. जेणेकरुन तुमचा वेळ वाचू शकतो. नाहीतर 'ट्रायल आणि एरर'मध्येच अनेकजण अडकतात. ही परीक्षा अशा लोकांसाठी मुळीच नाहीये. सॉलिड प्लॅन केला तर लवकरात लवकर यश मिळू शकतं. 🔴🔴 एकदा का पूर्वपरीक्षा नापास झाला तर तुमची पुढची अडीच वर्षे वाया जातात." 🔴🔴 Mes pre #1 #Nov
SSC Exam date postponed again
Result_RollNo_17-2019.pdf
143 KB
🔥MPSC mains 2019 results out
Forwarded from CivilMania
Keep Grinding 🔃
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०

📌केवळ पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांसाठी

📌पुणे, सातारा ,सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर मधील कायमस्वरूपी पत्ता असलेल्या उमेदवारांना केंद्र बदलण्याची मुभा नाही

@civilmaniaa
Forwarded from ARISE ACADEMY
🛑 Will MES Prelims be conducted on 1st November?

➡️ Yes...

➡️ MPSC is very positive in conducting exams with necessary precautions.

➡️ Govt. is in Unlock stage.

➡️ If 20th September Rajyaseva exams gets conducted Successfully, then it will confirm MES Prelims exam on 1st November.

🔰 Don't take Prelims lightly...
🔰 Target Minimum 45 marks...

🔥 Keep Studying Positively & Stay Corona Negative 💯

👉 Common Doubt of Students

Join
@ARISE_civil
Forwarded from ARISE ACADEMY
ALL MPSC PRELIMS PREVIOUS YEAR PAPERS (2017-2019).pdf
9.4 MB
📙 ALL MPSC PRELIMS PREVIOUS YEAR PAPERS (2017-2019) WITH FINAL ANSWER KEY

@ARISE_civil
Forwarded from Civil Info ©
परीक्षा समोर ढकलण्याच्या निर्णय वर काही जण टीका करीत आहे.
लक्षात घ्या सरकारने हा निर्णय विचार करूनच घेतला आहे.

राज्यात दळणवळण सुविधा अजून सुद्धा पूर्व पदावर यायचे आहे..बस सुविधा सुरू झाली असली तरी एका बस मध्ये फक्त 20 जणच प्रवास करू शकतात. तसेच बस फेऱ्या यांची संख्या सुद्धा फार कमी आहे.

उद्या अपुऱ्या दळणवळण व्यवस्था मुळे कोणी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचू शकले नाही तर हीच मूल सरकारच्या नावाने ओरडणार.

कोरोना नियंत्रण आणण्यात प्रशासन अहोरात्र झटत आहे. त्यात जर परीक्षा घेतल्या आणि कोरोना ची लागण युवा पिढीला झाली आणि हे युवक जर घरीं जाणार तर संपूर्ण कुटुंबात कोरोना संक्रमित होऊ शकते. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाणार तर काय करणार???

देशाचे गृहमंत्री पासून अनेक राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाग्रस्त होत आहे. उत्तरप्रदेश राज्याचे 2 मंत्री कोरोना मुळे मरण पावले.

देशात आज रोज घडीला 1000 लोक कोरोना मुळे मरत आहे.

आणि काही बुद्धीजीवी लोक म्हणतात कोरोना सोबत जगायला शिकले पाहिजे.

हे फक्त बोलायला सोपं आहे जेव्हा कुटुंबातील कोणी कोरोना ग्रस्त आढळतात तेव्हा देव आठवतात.

हे वर्ष आहे फक्त तग धरून ठेवायचे . कोणी म्हणतो वर्ष वाया जाईल कोणी मानतो आर्थिक नुकसान होईल.

पण जीव आहे तर सर्व आहे.

🛑दुसरी गोष्ट फक्त स्पर्धा परीक्षेवर सर्वाना रोजगार भेटणे शक्य नाही.

आज राज्य सेवेसाठी 3 लाखाच्या वर मूल बसत असतात त्यातून जेमतेम 300-400 मुलासाठी रोजगार तयार होईल.
म्हणजे Practical विचार केला तर परीक्षा झाल्या तरी 1 वर्षा नंतर जेव्हा अंतिम निकाल येईल तेव्हा फक्त 300 मुलांना नौकरी मिळेल फक्त त्याना फायदा होईल.

मग बाकी मुलाचे काय?? त्याचा रोजगाराची सोय कुठून होणार? हे प्रश्न शेवटी अनुत्तरित रहातातच.
@civinfo
Forwarded from Civil Engg
माझ्या भावी अधिकारी मित्र आणी मैत्रीणीनो...

अभ्यास....अभ्यास....अभ्यास... करत असालच तर मनात कुठलीही भिती बाळगू नका... हरवलेला आत्मविश्वास शोधा त्याला आता बाहेर काढा... माहिती आहे मला की, अधिकारी होण्याचे स्वप्नं पाहणार्या मुलिंना अनेक मर्यादा आहेत आणी मुलांना बंधना सोबत अनेक जबाबदारी आहेत... आणी त्यात आयोगाचे पेपर पुढे ढकलले गेले आहेत याच डिप्रेशन येतय..! पण विद्यार्थी ना तुम्ही हे विसरून कस चालेल ? जरा शोधा बरं विद्यार्थी म्हणजे काय ? याचा उत्तर... "कुठल्याही ज्ञानाच्या धर्तीवर, विवेक बुद्धीने ज्ञान धारण करुन जगणारा म्हणजे विद्यार्थी. " मग तुम्हाला न्याय देता यायला हवा या विद्यार्थी दशेला...

त्यासाठी विद्यार्थी हा उताविळ नसावा तर तो संयमी, चिकित्सक, जिद्दी, ध्येयवाडी, प्रामाणिक आणी आत्मविश्वासू असावा. मागेच अयोगाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आणी सगळेच जोमाने सिद्धत्वाच्या वाटेवर धावू लागले.. त्यात कालच बातमी धडकली की, " आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या..! " हे ऐकल आणी अनेक विद्यार्थी थबकले. काही लगेच तणावग्रस्त झाले. काही तर अक्षरशः व्हाटसअप, फेसबूक आणी सोशल मिडियावर ट्रोल करत आपल्यातला असंयमी विद्यार्थी प्रदर्शन करत निघाले. आयोग म्हणजे आज तमाम भावी अधिकारी वर्गाचे एक असे मंदिर आहे. जे तुम्हाला तुमच्या आयुष्याला प्रामाणीकपणाने न्याय देत आले आहे आणी देत आहे देत राहील...

मग तुमचा संयम जर आज फक्त परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून जर सुटत असेल तर, ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल... मित्रांनो जरा धीर धरा.. ही तूमच्या संयमाची परीक्षा आहे. त्यात यशस्वी व्हा. कारण संयम मातृत्व बहाल करतो. मग कोणते मातृत्व तर जिद्द, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांसारखी अनेक सामर्थ्यशील गुण संयमच जन्माला घालतो. मग बघा तुम्ही कुठल्या तणावात जगत आहे.. सोडा आता तरी त्या तणावाचे दार
..ह्वा तिथून फरार... आणी ठोठवा विवेक बुद्धीचे दार... शोधा तुमचे दोष, वाढवा तुमचा अभ्यासाचा व्यासंग... परीक्षा पुढ ढकलल्या गेल्या म्हणून टेंशन आले. ही कारण तुम्ही तुमच्या अपयशाला देऊ शकत नाही. पण परिक्षा आणी तुमच्यात पडलेल अंतर परिवर्तीत करा तुमच्या आत्मविश्वासात...

वेळ वाया जातोय ही कारण तुमच ध्येय सिद्ध होईपर्यंत तुमचा वेळ वाया जातोय अस जिथ कुठ वाटेल ना तिथ थोड थांबा...! बघा आतमधे डोकाऊन मग मिळेल एक उत्तर की, वेळ वाया जात नाही तो आपण घालवतो आहे..! म्हणून संयम बाळगा...! देशाच्या जवानांसारखी तयारी ठेवा..! युद्धाची मानसीक व शारीरिक तयारी ते एका दिवसात नाही पुर्ण करत. ती तयारी ते रोजच करत असतात. म्हणून ते खचत नाही. अपयशाचा विचारही ते कधीच करत नाही. कधी समोरुन क्षत्रूची गोळी येईल आणी रक्त पिऊन कायमची घेऊन जाईल...पण ना असते चिंता ना असते भिती असते फक्त तयारी..!

ती तयारी करा.. अभ्यास झालय पुर्ण ही फालतू कारण देऊन आपल्या भविष्याचा, आईबापाच आणी स्वताःचा अपमान तरी करु नका. कारण अभ्यास हा कधीच कुणाचाही पुर्णपणे पुर्ण होत नाही अगदी मरेपर्यंत... मग तुमचा अभ्यास झाला हे कोणीही मान्य करणार नाही. अगदी तुमचे मनही हे वाक्य फेटाळून लावेल. अभ्यास झाला होता राव...! मूड़ ऑफ़ झालाय..! तयारी झाली होती राव..! आता काय काराव ? हा जर विचार करत असाल तर कुठतरी चुकता आहे. पुढचे वेळापत्रक येईपर्यंत रोजचा दिनक्रम तसाच ठेवा... झालच शक्य तर मानसीक तयारी करा. या परिक्षेसोबतच आयुष्यातील कुठल्याही परीक्षेला सामोरी जाण्याची तयारी... खंबीर, संयमी आणी शांत व्हा.. ती सर्वात मोठी ताकद आहे सामर्थ्याची...

तुमच्यातला ध्येयवेडा माणुस कधीच शांत होऊ देऊ नका. तो शांत झाला तर वाट्याला येणारी प्रश्नावली आयुष्य नैराश्ययुक्त करते. मित्रांनो मला माझे शेकडो मित्र रोजच भेटतात. आणी एक निर्जीव वाक्य वापरतात. " सरकारी नौकरी मिळवण म्हणजे जोक नाही. " मान्य आहे मला हे सगळ. पण हे वाक्य कन्व्हर्ट करता यायला हव. हे वरील वाक्य विनोद आहे फक्त त्यांच्यासाठी जे जिवंतपणी मृत अवस्थेत जगत आहे.. हा विनोद आहे त्यांच्यासाठी जे आयुष्य फक्त मौजमजा करत वाया घालवत आहे मग तुम्ही कोण ? ठरवा... काय करनार हाती आलेल्या वेळेचा सदउपयोग कसा करावा ते.. कारण "प्रत्येक गोष्टीतिल वेळेचे योग्य व अचुक नियोजन तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते..."

शेवटी एकच सांगेल तुकोबारायांच्या शब्दात...

असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे...!

जालिंदर जगताप, औरंगाबाद
( सकाळ मिडीया माध्यम औरंगाबाद )
नानाश्री क्रियेशन & बीजनेस गृप
मो. 7057127307
Official announcement by MPSC regarding postpone of all exam dates.